Skip to main content

Posts

Showing posts from December, 2013

शाळा चालतात किती दिवस ?

शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी  मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला.  लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि  निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध कसा लावला

देवयानी shame on youदेवयानी Shame on u !!!!!! देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते. बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी काळी बाजू मांडू लागली तर हे महाशय याला जातीद्वेष म्हणतात. वा ! आदरणीय बाबासाहेबांनी दलित बांधवांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिलीय. आपला अन्याय आपणच दूर करावा असे बाबासाहेब म्हणत.ते कधी कॉंग्रेसच्या दारात गेले नव्हते . याच कॉंगेसने बाबासाहेबांना मुंबईतून पराभूत केले होते. बाबासाहेब बंगाल मधून जिंकून घटना समितीत गेले होते. कुठे ती बाबासाहेबांची आदर्शवादी शिकवण आणि कुठे तुझे तीर्थरूप ? काल लोकमत च्या मुलाखतीत चे महाशय म्हणतात कि माझ्या मुलीने पाकिस्तानात जीव धोक्यात घालून देशसेवा केली. काय फुकट केली का सेवा? पगार मिळाला नाही का? आणि मग दिवसरात्र सीमेवर आमचे सैनिक काय पाकिस्तानची सेवा करतात काय हो ? या देवयानीला अमेरिकेत नोकरचाकर मिळत नाहीत का? एवढी ऐपत नाहीत का? मग आदर्श सोसायटीत ३-३ flat घ्यायला बरे पैसे आहेत तुझ्याकडे ? या देवयानीला भारतीय कामगार कायद्यानुसार कमी वेतनावर काम करून घेतले म्हणून भारतच खटला भरा. महिलेवर अन्याय केला म्हणून हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार हिला अटक करा. हिला परत संयुक्त राष्ट्रात कशाला पाठवताय? कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे ते वाकडेच राहणार. हे खोब्रागडे कुटुंब देशाची अब्रू वेशीवर टांगतील . त्यापेक्षा घ्या माघारी बोलावून तिला. या अधिकार्याने महिला कामगारवर अन्याय केला म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. आणि पोलिसांनी देवयानीची चौकशी केली. इतके साधे चे प्रकरण . पण पहा रंग कसे दिलाय तो ! आता अमेरिकन पोलीस म्हणजे काय नाक्यावरचा पोलीस नाही ना. चिरीमिरी देऊन सुटायला. ते पोलीस त्यांच्या अध्यक्षाच्या पत्नीला सुद्धा अटक करायला मागे पुढे पाहत नाहीत मग हि देवयानी तर कीस झाड कि पत्ती ! पुढे काय म्हणतात हिचे तीर्थरूप तर म्हणे त्या संगीताने अमेरिकेत गेल्यावर मी पार्ट टाइम काम करणार असे सांगितले. अहो खोब्रागडे आम्ही काय अमेरिकेत गेलो नाही काय? व्हिसा मधील कोणतीही अट मनमानी पद्धतीने बदलता येत नाही. त्यासाठी वकिलातीची परवानगी घ्यावी लागते. ना संगीता पार्ट टाइम काम करू शकते ना देवयानी कमी पगार देऊ शकते. आपण दलित असल्याचे भांडवल करू नका खोब्रागडे. कायद्यानुसार होणाऱ्या करवाईला सामोरे जा. आणि हो अमेरेकन वकिलातीला विशेष सुरक्षा पुरवायला कोणी सांगितले होते? देवयानीवर अन्याय केला म्हणून भारत काय करतो तर बॉरीकेट काढून घेतो. आणि सांगतो कि तुम्हाला आता नियमानुसारच संरक्षण मिळेल. पण इतके दिवस दिलेच कसे चे संरक्षण ? नियम तोडायला कोणी सांगितले होते? अमेरिकन लोक भारतात राहतात ते त्यांच्या बळावर. आपल्या सुरक्षेवर त्याना सोडा आपल्याला पण विश्वास नाही. आपली सुरक्षा राहुल नावाच्या शेंडफळाला. दोन दिवस एका गरीब घरात राहायचे. परत ढुंकून पण पहायचे नाही. कागद फाडून टाका कायदे फाडा असे म्हणायचे . मग काय लोक यालाच निवडणुकात फाडून टाकतात. कारण याचा दुटप्पीपणा लक्षात येतोय ना. याची आई उत्तर प्रदेशातील महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला म्हणून लगेच पत्र लिहिते पण हिचा जावई हिमाचल मध्ये एका अधिकाऱ्याला कसा छळतो त्या कडे हिचे मात्र दुर्लक्ष. असो. थांबतो आता. उद्या पेपर आहे त्याचा अभ्यास करतो.

देवयानी Shame on u !!!!!! देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP  वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला  सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते. बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी