Skip to main content

love


                                                           





                    आणि अखेर प्रेमभंग झालाच ! मनातील भीती खरी ठरली.म्हणजे माझ्या प्रेमाचा तिने स्वीकार केला नाही , असे नव्हे . पण आमच्या प्रेमाचे लग्नामध्ये रूपांतर होणार नाही हे स्पष्ट झाले.कारण आमच्या प्रेमाची कुणकुण लागताच तिचे लग्न ठरवण्यात आले.एकदम पारंपरिक मार्ग.मुलीला भावनिक आवाहन करून लग्न जुळवणे.तिचा तो भावी नवरा गेली कित्येक दिवस तिच्या घरच्यांच्या मागे लागला होता.अखेर त्याची इच्छा फलद्रूप झाली.नशीबवानच तो.
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत हे तर गेली अनेक वर्ष वाचत आलोय.अर्थ कळत नव्हता तेंव्हापासून वाचतोय. लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणीत अदिती जे इंटीमेंट हे सदर लिहिते ते तिने सुरवात केली तेंव्हा पासून वाचतोय. हिला काय करायच्यात लोकांच्या भानगडी असे नेहमी वाटायचे.हि वेडी आहे का?उगाच का सल्ले देत बसते.असे अनेकदा वाटायचे.पण ते लेख वाचायला मस्त वाटायचे.अरे यार हे प्रेम नेमकं काय असते.?प्रेमात पडतोय हे कसे काय कळत नाही?प्रेमात ही दोघे वेडी कशी होतात?हे मला कळत नव्हते........... आणी अखेर मला ते समजलेच .!!!!!!!!! कारण मीच प्रेमात पडलो ना ...............साधारणतः ६ महिन्यांपूर्वी आमची ओळख झाली.आणी ३ दिवसात तर तिने मला प्रपोज केले.प्रेमातील मानसिक सुखाचा अनुभव मी घेतला.या जगात आपली काळजी घेणारे कोण तरी आहे?ही भावनाच खूप आनंद देते ना ..!!!! १४ फेब्रुवारी ला आम्ही प्रेम निभावण्याची शपथ घेतली खरी पण २५ फेब्रुवारी ला तर आमचे प्रेम तिच्या घरी समजलेच. आणी  माझ्या प्रेमाचा निकाल पण लागला. खूप खूप रडलो . मन खूप सैरभैर झाले.जीवन जगण्याची इच्छा नसल्याचे जाणवले. राष्ट्रीय विज्ञान दिनी तिने शेवटचा sms पाठवला.तो वाचून तर अजुनच पागल.अक्षरशः वेडाच होणे बाकी होते.पण सावरणे तर भाग होते.प्रेमभंग झाला म्हणून जीवन संपवण्याचा विचार सोडून देणे भाग होते कारण मी जीवन संपवले तर मग ती पण संपवणार !!!!! माणसे मरणार २ आणी उधवस्त होणार ९ माणसे.हे मला पटत नव्हतेच . या कठीण प्रसंगात अदिती चे जुने लेख वाचून मनाने उभारी घेतली. thanks Aditi!!!!! मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा तिनेच दिली.आता माझे स्वप्न हे केवळ माझे न राहता दोघांचे होते.असो .ते नाही सांगायचे.
माझ्या मनात जरा वेगळेच विचार येतायेत.ग्रामीण – निमशहरी भागातील पालक आपल्या मुलांना प्रेम का करू देत नसावेत?जिथे मुलामुलींना एकमेकांना एकही शब्द बोलण्याची परवानगी नाही अशा विचित्र वातावरणात अनेकजण वावरतात.मी पण त्यातील एक.पण मनं जुळली एकमेकांचे विचार जुळले की मग नाते का निर्माण करू दिले जात नाही?आणि मी तर आंतरजातीय विवाह करण्याचे स्वप्न पाहत होतो.खरं तर मला अशीच अचाट स्वप्न पडतात.पारंपरिक विचारांना छेद देणारी. आंतरजातीय विवाह न करू देण्यामागे सामाजिक दबावाचा फार मोठा परिणाम पालकांना असे वागण्यात भाग पडत असावा.आपल्या मुलाने वा मुलीने पळून जाऊन लग्न केले तर .................? समाजात आपली बदनामी होईल .”खानदान की इज्जत ....!!!” किंवा ऑनर किलिंग असे प्रकार यातूनच निर्माण  होतात ना.मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात  अशी घटना घडली. इंदापुरात पण प्रेमी जोडप्याने लग्न करता येत नाही म्हणून आत्महत्या केली. असे  अनेक किती बळी जाणार?..... समाजाची मानसिकता कधी बदलणार? विलासराव देशमुखांनी जी हिम्मत दाखवली ती आपण कधी दाखवणार?मुलांचे सुख महत्त्वाचे की  समाजातील प्रतिष्टा महत्वाची? आणि जर समाजातील प्रतिष्टा महत्वाची मानली तर मग ऑनर किलिंग चे प्रकार घडत राहणारच.उलट यात वाढच होत जाईल.आज एक प्रेमी म्हणून मी माझी भूमिका मांडतोय असे नाही.कारण या घटनेने एक बाबा माझ्या लक्षात आली की आपण आणि आपले आईवडील यांच्यात याबाबतीत संवाद वाढायला हवा.सहसा असे विषय आपण शेअर करत नाही.सुसंवादाचा अभाव जाणवतोय....पण मला अजून ही वाटते की माझ्या मैत्रिणीचे मत तिच्या बाबांनी विचारायला हव होते.ती ज्या मुलावर प्रेम करते ज्या सोबत तिने सुखी जीवनाची स्वप्न पाहिली होती ती सर्वच स्वप्न धुळीस मिळाली ना!!!!!!! विशेष असे की तिची स्वप्न तिच्या बाबांनीच उधवस्त केलीत.चक्काचुर झाला स्वप्नाचा. मग भविष्यात मी माझ्या मुलांच्या स्वप्नांचा असा   चक्काचुर करावा का ? पालकांना हे कसे सांगावे? आणी पालकांनी मुलांना कसे समजून घ्यावे?सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहतात. तुम्हीच ठरवा काय करायचे ते........

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय