Skip to main content

Posts

Showing posts from 2015

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले प्रती    गिरीश कुबेर (लोकसत्ता)  व राजीव खांडेकर( ABP माझा )        विषय : माध्यमांच्या घटनाविरोधी  वैचारिक असहिष्णुतेबाबत       महोदय ,                         सप्रेम नमस्कार .              आपण दोघेही प्रसार माध्यम क्षेत्रातील बिनीचे मराठी शिलेदार आहात याचा मला सदैव अभिमान असतो.समाजातील प्रत्येक घटनेमागे पाहण्याची दृष्टी आपण देत असता. मात्र मागील काही महिन्यांपासून मी निरीक्षण करतो आहे, आपले विचार स्वातंत्र्य  काहीसे स्वैरपणे उपभोगत आहात असे वाटते.मला एक भारतीय नागरिक म्हणून घटनेने जितके मुलभूत हक्क दिलेत तितकेच ते तुम्हाला देखील दिले गेले असावेत अस मला वाटत.एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घटनेने काही जादा अधिकार दिले असतील तर मला मात्र मला अल्पज्ञानी समजावे.मात्र लोकसत्तेच्या अग्रलेखातून विशिष्ट समाजघटकाला  “ दळभद्री ”,  “ बिनडोक ”  असे विशेषण लावत शाब्दिक आसूड ओढणे हे कितपत संयुक्तिक आहे?याच आठवड्यातील २ घटनांवर तर आपले विचार स्वातंत्र्य  अधिकच स्वैर झाल्याचे जाणवते.पहिली घटना होती शनी शिंगणापूर च

Sharing a concept of QR code Tutor Model at Digital Maharashtra program ...

Receiving a prize of " Blog MAZA" competition organised by ABP MAZA news...

Feedback from Officers.

Feedback from a teacher

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी....www.ranjitsinhdisale.blogspot.in

       प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी www.ranjitsinhdisaleblogspot.in ·          साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी  कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले. गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत राहिली. एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या  तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण पुढे तोट्या गायब होने बंद झा

Teacher loves technology.

How QR codes work on mobile

How these QR codes are used in classroom ?

Parents using QR codes at home and giving feedback

१० वी च्या “असर”दार निकालाचे ‘कुबेरी” विश्लेषण

१० वी च्या “असर”दार निकालाचे ‘कुबेरी” विश्लेषण दरवर्षी प्रमाणे १० वी चा निकाल घोषित झाला. आपल्या मुलानी गुणवत्तेचे झेंडे अटकेपार लावले.सर्वप्रथम अभिनंदन करतो मी या सर्व मुलांचे. आज लेखनाचा विषय मात्र वेगळा आहे. निकालाच्या दिवशी एक मेसेज whatsapp वर फिरत होता.तो असा ५ वी च्या मुलांना बेरीज येत नाही ६ वी ची मुले भागाकार करत नाहीत. ८ वी च्या मुलांना तर वाचता येत नाही असा अहवाल देणारी संस्था शोधून काढा रे.............. हा मेसेज वाचल्यावर असे जाणवले कि ही शिक्षक लोकांची तात्कालिक भावना आहे. किंवा प्रथम कारांचे निक्ष्कर्ष चुकीचे ठरले याचा त्यांना आनंद झाला असावा.मात्र दुसऱ्या दिवशी लोक-मान्य लोक-शक्ती असे बिरूद मिरवणाऱ्या फुटकलांनी तर आम्हाला यांची काळजी  वाटते असे कुबेरी विश्लेषण केले.याना अजून जाग आलेली दिसत नाही. विधानसभेत झालेला निषेध विसरलात कि काय???. गरीब शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या कि यांना ते नाटक वाटते; आमच्या मुलांनी मेहनतीने यश मिळवले कि यांना काळजी वाटते... त्या सबंध लेखात कुठेही मुलांचे साधे अभिनंदन केले नाही.या कोत्या कुबेरी मनोवृत्तीची कंपा

Education for all 2015-2030

नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या वतीने EDUCATION FOR ALL  या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद द.कोरियातील इंचोन येथे आयोजित करण्यात आली होती. सन २००० साली सेनेगल मधील डकार येथील परिषदेत निश्चित केलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेत पुढील १५ वर्ष्यान्साठी जागतिक उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी या परिषदेत मंथन करण्यात आले. याला अनुषंगून सन २००० ते २०१५ या कालावधीत जागतिक स्तरावर शिक्षण व्यवस्था किती प्रगत झाली आहे?? याचा उलगडा करणारी ही टिपणी..... युनेस्कोने सर्व राष्ट्रांना मागर्दर्शक असा कृती आराखडा पुढील ६ कलमांवर मांडला आहे. १.       पूर्व प्राथमिक शिक्षण व बालकांची आरोग्यविषयक काळजी २.       प्राथमिक शिक्षण ३.       युवकांचे कौशल्य विकसन ४.       प्रौढ शिक्षण ५.       गुणवत्तापूर्ण शिक्षण ६.       लैंगिक सक्षमता व समानता. या क्षेत्रात भारताने मागील १५ वर्षात केलेली कामगिरी पाहणे गरजेचे वाटते.         पूर्व प्राथमिक शिक्षण व बालकांची आरोग्यविषयक काळजी या क्षेत्रातील आपली प्रगती पाहिली तर आपण बाल मृत्यू प्रमाण जवळपास ५०% नी कमी करण्यात यश मिळवले आहे.जागतिक स्तरावर देखील हाच कल  दि

ओझे नेमके कशाचे????????????????

       ओझे नेमके कशाचे????????????????   Ranjitsinh Disale महाराष्ट्रातील तमाम शाळकरी मुलांच्या पाठीवर भौतिक सुविधांचे ओझे आहे कि बोजड आशयाचे ओझे आहे? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उकल म्हणून समितीची स्थापना झाली.या समितीने आपला अहवाल देखील दिला.मात्र या समितीने १९९३ साली प्रो.यशपाल यांनी सादर केलेल्या ओझ्याविना अध्ययन या अहवालाचा जराही विचार केल्याचे जाणवत नाही.१९९३ सालच्या या अहवालात आताच्या समस्येवर ५ सूत्री उपाय सुचवल आहेत .  (वाचा. www.ranjitsinhdisale.blogspot.in) ज्याचे प्रतिबिंब ncf 2005 मध्ये उमटले आहे.मात्र याकडे राज्य शासनाच्या समितीने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.कदाचित समितीला केवळ भावनिक उपाय सुचवायचे असावेत.कारण ज्या शिफारशी सुचवल्या आहेत त्या अशात्रीय आहेत,असे वाटते. मुळात आशयाचे ओझे आहे तरी काय? किती आहे आशयाचे ओझे? या प्रश्नांची उकल या लेखातून करून घेवूयात.जर १ ली ते ४ थी च्या पाठ्यपुस्तकावर नजर टाकली तर पुढील निरीक्षणे मी नोंदवली आहेत. १ ली चे मूल  वर्ष्यातील साधारण २२०-२४० अध्यापन दिवसात मराठी,गणित व इंग्रजी या ३ विषय

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७