Skip to main content

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले


प्रती
   गिरीश कुबेर (लोकसत्ता)
 व राजीव खांडेकर( ABP माझा )


       विषय : माध्यमांच्या घटनाविरोधी  वैचारिक असहिष्णुतेबाबत

      महोदय ,
                        सप्रेम नमस्कार .

             आपण दोघेही प्रसार माध्यम क्षेत्रातील बिनीचे मराठी शिलेदार आहात याचा मला सदैव अभिमान असतो.समाजातील प्रत्येक घटनेमागे पाहण्याची दृष्टी आपण देत असता. मात्र मागील काही महिन्यांपासून मी निरीक्षण करतो आहे, आपले विचार स्वातंत्र्य  काहीसे स्वैरपणे उपभोगत आहात असे वाटते.मला एक भारतीय नागरिक म्हणून घटनेने जितके मुलभूत हक्क दिलेत तितकेच ते तुम्हाला देखील दिले गेले असावेत अस मला वाटत.एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घटनेने काही जादा अधिकार दिले असतील तर मला मात्र मला अल्पज्ञानी समजावे.मात्र लोकसत्तेच्या अग्रलेखातून विशिष्ट समाजघटकाला  “ दळभद्री ”,  “ बिनडोक ”  असे विशेषण लावत शाब्दिक आसूड ओढणे हे कितपत संयुक्तिक आहे?याच आठवड्यातील २ घटनांवर तर आपले विचार स्वातंत्र्य  अधिकच स्वैर झाल्याचे जाणवते.पहिली घटना होती शनी शिंगणापूर ची व दुसरी होती मुंबई च्या एका चित्रपट गृहातील.या घटनांवर आपण पुढील शीर्षकाने अग्रलेख लिहिलेत.

·       “ भेदाभेद भ्रम अमंगळ” ,
·       “ बिनडोकांची राष्ट्रभक्ती ” ,
·        “ परंपरांच संमोहन ”.
                        (हे अग्रलेख वाचकांनी जरूर वाचावेत ).

शनी शिंगणापूर च्या प्रसंगाकडे तटस्थ पणे पाहण्याची परिपक्व मानसिकता आपल्याकडून अपेक्षित होती.कारण तिथे “ ती ” महिला व गावकरी यांनी केलेली कृती ही घटनेच्या चौकटीत राहूनच केली होती. त्या महिलेने चौथऱ्यावर जात तेल वाहणे ही कृती तिला घटनेने  दिलेल्या संचार स्वातंत्र्याशी सुसंगतच आहे.त्याच वेळी गावकऱ्यानी दुग्धाभिषेक घालण्याची कृती घटनेतील कलम 25 चे पालन करणारी होती.इथे कुठेही घटनेची पायमल्ली झाली नाही ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना तुम्ही प्रसार माध्यमांमधून समाजमनात या घटनेविषयी द्वेष भाव निर्माण होईल अशी वार्तांकन केल्याचे वारंवार दिसून आले.अगदी काही क्षणात तुम्ही गावकऱ्यांना प्रतिगामी ठरवले. मुळात शनी शिंगणापूर च्या ग्रामस्थांनी चौथऱ्यावर जाण्यास केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांना देखील मनाई केली आहे हे वास्तव तुम्हीदेखील जाणून आहात..मूर्ती चे पावित्र्य कायम राहावे म्हणून नव्हे तर त्या मूर्तीचे संवर्धन व्हावे म्हणून हा निर्णय घेतला आहे अस त्या विश्वस्तांच म्हणणे देखील तुम्ही मान्य करायला तयार नाहीत.मात्र त्या महिलेच्या कृती मुळे मंदिर अपवित्र झाले म्हणून गावकऱ्यानी दुग्धाभिषेक केला हा तुमचा तर्क तुम्ही लोकांच्या गळी उतरवण्याचे काम करत राहिलात.आणि या तुमच्या कृतीचे समर्थन करणारे पुरोगामी व याच्या विरोधी मत असणारे प्रतिगामी अशी वर्गवारी देखील तुम्ही करून टाकली.भारतीय राज्य घटनेने नागरिकांना मुलभूत हक्क हे अनिर्बंध वापरासाठी दिलेले नाहीत. मुलभूत हक्कांच्या वापरावर भारताची / राज्याची एकात्मता,सुरक्षितता,सार्वजनिक सुव्यवस्था , सभ्यता किंवा नितीमत्ता या कारणास्तव बंदी घालता येते, हे तुम्ही देखील जाणून आहात.मग जर संचार स्वातंत्र्यावर सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखणे याकारणास्तव शनी शिंगणापूर च्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यापासून काही निर्बंध लादले गेले असतील तर ही बाब घटनेतील तरतुदीशी सुसंगत नाही का ? विश्वस्तांचे प्रतिनिधी ABP माझा च्या विशेष चर्चेत हीच बाब अधोरेखित करत होते ; मात्र बडे नामक ABP माझा चा सूत्रसंचालक गावकऱ्यांच्या  कृतीला महिलेचा विटाळ झाला म्हणून वारंवार संबोधित करत होता , हे मात्र नीतिमत्तेचा व सभ्यतेचा भंग करणारे होते. त्या सूत्रसंचालकाच्या त्या सातत्यपूर्ण वक्तव्यामुळे महिला शक्ती कार्यकर्त्या अधिकच आक्रमक झाल्या नसत्या तर नवलच.TRP वाढवण्याच्या नादात आपण समाजात कोणता  संदेश देत आहोत याचे भान बडे ला राहिले नाही.
जी चूक बडे ने केली तीच चूक अभिजित कारंडे हा ABP माझा चा सूत्रसंचालक ४ डिसेंबर च्या चर्चेत करताना दिसला.एखाद्या घटनेवर एक महिला म्हणून पंकजा मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले.मात्र इतरांच्या मताचा आदर करावा याचे सौजन्य तो दाखवू शकला नाही.एक निरीक्षण असे कि या २ माध्यमांच्या विरोधी भूमिका जे घेतात त्यांना ही २ माध्यमे प्रतिगामी ठरवतात.मुळात माध्यमाना असे अधिकार आहेत का ? हा प्रश्न उपस्थित होतो.असे समाजात चुकीचे संदेश देणारे प्रसारण आपण नक्कीच टाळू शकतो.जरी एखादी कृती घटनेतील तरतुदींशी सुसंगत असली मात्र ती या २ माध्यमांच्या विचारधारेशी विसंगत असेल तर ही माध्यमे लगेच शाब्दिक आसूड ओडल्याशिवाय राहत नाहीत असे सकृतदर्शनी वाटते.कारण पंकजा मुंडे यांच्या विधानाला वा व्यक्त केलेल्या मताला लोकसत्तेने तर्कटांचे शेलके विशेषण जोडले आणि आज ५ डिसेंबर ला लगेच अग्रलेख देखील लिहून टाकला.मग प्रश्न असा निर्माण होतो कि या देशात घटना श्रेष्ठ कि ही २ माध्यमे ? कारण घटनेचे पालन करत केलेल्या कृतीना हे त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध मानतात.लोकसत्तेची ही कुबेरी वृत्ती “ बिनडोकांची राष्ट्रभक्ती ” या अग्रलेखातूनदेखील  व्यक्त झाली आहे.Prevention of insults to national honors act चा आधार घेत अप्रत्यक्षपणे वाजवल्या जाणाऱ्यां राष्ट्रगीताचा मान राखणे बंधनकारक नाही असा तर्क त्यातून व्यक्त झाला आहे.या विधानाचे किती दूरगामी परिणाम होतील याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. एक भारतीय नागरिक मुलभूत  कर्तव्य पार पाडत नसेल तर त्यावर घटनेत उल्लेखित कारवाई होईल.आज मी माझ्या शाळेत वीज नसताना मोबाईल वर राष्ट्रगीत ऐकवून परिपाठ घेतो.राष्ट्रगीताचा  मान राखावा या कर्तव्याची जाणीव भावी नागरिकांना मी करून देत असतो.मात्र राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे हे  ती प्रतीके ज्या माध्यमातून प्रसारित होतात त्यावर अवलंबून आहे  अशी घटनाविरोधी भूमिका गिरीश जि आपण घेत आहात ती राष्ट्रीय एकात्मतेस नक्कीच अहितकारक आहे असे तुम्हाला वाटत  नाही का ? .लोकसत्तेची  ही भूमिका घटनेत उल्लेखित मुलभूत कर्तव्याशी मात्र पूर्णतः विसंगत आहे.आपली राष्ट्रीय प्रतीके मग ती कोणत्याही माध्यमात असोत एक नागरिक म्हणून आपण त्यांचा मान राखला पाहिजे अस एक सामान्य नागरिक म्हणून माझ मत आहे.आपला राष्ट्रध्वज जर एखाध्या वृत्तपत्रात छापून आला असेल तर तो पेपर सांभाळून ठेवण्याचे संस्कार आम्ही भावी नागरिकांवर करत असतो.मात्र राष्ट्ध्वज फडकत असेल तरच त्याचा मान  राखला जावा बाकी इतर ठिकाणी नाही अशी भूमिका घटनाविरोधी नाही का ? मात्र राष्ट्रप्रेमाच्या सामजिक उर्जेने प्रेरित समाज घटकास  “ बिनडोक “ असे संबोधणे कितपत सभ्य आहे ? अशा घटना विरोधी भूमिकेमुळे जर तुम्ही पुरोगामी ठरत असाल तर मग आम्हा भारतीय नागरिकांचा दोष तो काय ? एक माध्यम प्रतिनिधी म्हणून अशी घटना विरोधी भूमिका तुम्ही कशी काय घेवू शकता? अशी घटना विरोधी भूमिका घेण्याचे विशेषाधिकार तुम्हाला दिले गेले असतील तर आम्हाला देखील ते सांगावे.आपण दोघेही आता हळूहळू विरोधी पक्षाच्या भूमिकेत जात असल्याचे जाणवत आहे. भारतात मिडीया हाच सर्वात प्रभावी व कायमस्वरूपी विरोधी पक्ष राहिला आहे . शिक्षण धोरण मसुद्यावर असेच आपण चुकीचे चित्र निर्माण करणारे वार्तांकन केले होते याचे स्मरण करून द्यावे वाटते.मात्र सामजिक घटनांकडे वार्तांकनाच्या नजरेतून कसे पाहावे हे  पँरीस हल्ल्यानंतर च्या स्थानिक वार्तांकनाहून नक्कीच बोधप्रत आहे.मात्र आजही आपण असे चुकीचे संदेश समाजात बेधडक पसरवत असतो.
लहान तोंडी मोठा घास वाटेल ही , पण व्यक्त होणे महत्वाचे वाटले म्हणून लिहिले.लोकसत्ता काय किंवा ABP माझा काय ही माध्यमे जेंव्हा घटनाविरोधी भूमिका घेतात तेंव्हा देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी वा न्यायालयांनी  काही हस्तक्षेप करावा का? स्वयांनिर्धारित शासन प्रणाली माध्यमांनी स्वीकारली आहे त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का ? असे प्रश्न मनात आहेत . आपले विचार नक्की मांडा
                                                 तूर्तास थांबतो .
                                                                पुन्हा भेटूया
रणजितसिंह ङिसले,बार्शी
                                                                          ९४०४६६५०९६

 onlyranjitsinh@gmail.com

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय