Skip to main content

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा.


“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा. ”
 अरे काय  तुला  वेड लागलाय का ? चप्पल आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध.  आहे हो. कसं आहे मित्रांनो  जर आपले  पाय पोळत असतील तर काय करतो  आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत असतो. पण  पाय पोळू लागले म्हणून तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे. आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू नका तुम्ही अगोदर चप्पल घाला
 मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा भ्रष्टाचार करतो. चला आता आपण समाजातील इतर लोक कसा भ्रष्टाचार करतात ते पाहू. या लेखमालेसाठी लेखन करताना मला असे जाणवले कि समाजातील कोणताही घटक या भ्रष्टाचार रुपी राक्षसापासून दूर नाही. आणि जर हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सोपा उपाय .
                  “ प्रत्येकाने आपला भ्रष्टाचार थांबवा.”
है हा काय उपाय आहे काय ? हो हाच आहे उपाय. कसा ते पहा.
 “ मी कोणत्याही कामासाठी लाच घेणार नाही. बिना पैश्याची कामे करीन. जी कामे नियमात आहेत  ती करीन.”
ही प्रतिज्ञा कुणी करावी ?
तर सर्व सरकारी नोकरांनी. मुख्य सचिव , उप सचिव, अप्पर सचिव , अधिषक,संचालक, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी , ग्रामसेवक. कारण हे  लोक नियमात असणारी कामे पण करत नाहीत.. जर यांनी फक्त नियमातील कामे केली तरी बराच भ्रष्टाचार थांबेल.
सामान्य नागरिकांनी काय करावे तर 
मी कोणाला पण लाच देणार नाही. कारण मी लाच देतो म्हणून तर ते घेतात ना.
मी बस/रेल्वे/विमान  मध्ये तिकीट काढून बसेन. बस मध्ये रोजच प्रवास करत असेन तर १०% चा पास काढीन.पण  डुप्लीकेट अपंग पास काढणार नाही.कारण या डुप्लीकेट पास मुळे बिचारा वाहक चालक यांना कमी पगार मिळतो. मी जर तिकीट काढून रोजच प्रवास केला तर मग महामंडळाचे उत्पन्न वाढेल आणि ते मग यांना जास्त पगार देतील.
मी रेशनकार्ड वर मिळणारे धान्य खरेदी करीन . कारण मी ते खरेदी करत नाही म्हणून ते मग व्यापारी घेतो आणि जास्त भावाने विकतो.
मी बँकेत रांगेत उभा राहून माझे काम करीन .उगाच गोंधळ घालून गर्दीत घुसणार नाही. त्या बँकेत माझा भाऊ असला तरी मी रांगेतच उभा राहीन. यामुळे  काय होणार तर रांगेत म्हातारी माणसे असतात त्यांना वेळात पैसे मिळतील. मी नियम पाळले तर त्यांना फायदा होईल . आणि उद्या जेंव्हा मी म्हातारा होईन तेंव्हा मला पण वेळात पैसे मिळतील. जर मला भविष्यात असे घडवायचे असेल तर मग हे बीज आताच पेरावे लागेल.
मी एक contractor आहे. मी लाच न देता कामे मिळविण.जरी कामे मिळाली नाही तरी चालेल. पण लाच न देता काम मिळवीन.  कारण मी काम quality  चे करीन. यासाठी मी अभियंत्यांना पण लाच देणार नाही. कारण जर मी रोड चांगला केला तर उद्या मी किंवा माझी मुलगी याच रोड वरून गेली आणि रोड खराब असेल तर याचे दुष्परिणाम माझ्याच कुटुंबाला भोघावे लागतील. भविष्यात मला या रोड वरून जाताना खड्डे नसावेत असा रोड करीन.
मी आहे  बसचा चालक. मी प्रवास्यांना त्यांचे सुट्टे पैसे आठवणीने परत करीन. उगाच १ , २  रुपये खाणार नाही. कारण १, २, रुपयांनी सुद्धा माझ्याकडे एका फेरी माघे बरीच रक्कम गोळा होते. असा चोरीचा पैसा मला पचणार नाही. ज्या पावलांनी पैसा आला त्याच पावलांनी जाणार.
मी आहे गटशिक्षणाधिकारी. मी पैसे न घेता बदल्या करीन. नियम मोडणाऱ्या शिक्षकाना शिक्षा करीन. पण पैसे उकळणार नाही. जे शिक्षक चांगले काम करतात त्यांनाच उत्कृष्ट शेरा देणार आणि वेतन वाढ देणार. पैसे घेऊन शेरे देणार नाही. माझी बदली पण पैसे न देताच करीन.
मी आहे बांधकाम खात्यातील अभियंता. मी कोणतेही contract  पैसे न देता नियमातील अटी पाहूनच देणारं. काम कसे  quality चे होईल ते पाहीन. कारण याच रोड वरून मला जावे  लागेल. खराब रोड मुळे मलाच मान पाठ याचे विकार होतील. पैसे घेऊन आजार विकत घेणार नाही. मी पैसे घेतले नाही  तर contractor पण काम चांगले करील. माझा आणि देशाचा फायदा.
ही तर आहेत प्रातिनिधिक उदाहरणे. तुम्ही पण सामील व्हा आणि संपवा हा भ्रष्टाचार !

Comments

  1. चांगली कल्पना आहे. Try करून बघायला हरकत नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय