Skip to main content
                  सरकारी शाळांसमोरील आव्हाने : उत्तरार्ध

मागील भागात आपण ४ आव्हाने विचारात घेतली . आता शिक्षकांच्या संदर्भातील आव्हाने पाहू.
आव्हान क्र ५. प्रशासनासमोर शिक्षकांच्या गुणवत्तेचा पूर्ण वापर करण्याचे आव्हान आहे.
कसे ते पहा. सरकारी वा अनुदानित शाळांमधील शिक्षकांची निवड हि अनेक कठोर निकष लावत केली जाते. त्यामुळे हे सर्व शिक्षक गुणवत्ता धारकच असतात. याउलट विनानुदानित शाळांमध्ये हा निकष क्वचितच लावला जातो. मग जर सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता धारक शिक्षक असतील तर मग या गुणवत्ता धारक शिक्षकांचे विद्यार्थी का मागे पडतात ? हे न उलगडणारे कोडे आहे. याचा अर्थ असा होतो कि एक तर या शिक्षकांना कामात रस राहिला नसेल कारण काम केले अथवा न केले तरी आर्थिक स्थैर्य राहत असावे. नाहीतर या शिक्षकांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे कौशल्य प्रशासनाकडे नसावे. आता हे आव्हान आहे हेच  काहीना  मान्य नसण्याची शक्यता आहे. मात्र हे मान्य करा अथवा न करा वस्तुस्थिती बदलणार नाही. सरकारी शांलांमध्ये वेतन व काम हे दोन्हीही सरकारी पध्दतीने मिळते. पण जर वेतन शासकीय नियमान्वये दिले आणि कामकाज खाजगी शाळांमधील पध्दतीने केले तर  कदाचित या वर मात करता येईल.
  आव्हान क्र ६. शिक्षक संघटनाच्या हस्तक्षेपाला झुगारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
बाकीच्या राज्यात शिक्षक संघटना आहेत कि नाहीत याची मला कल्पना नाही . पण आपल्या  महाराष्ट्रात मात्र शिक्षक संघटनाचा दबाव प्रशासनावर कायम असतो. मग या दबावाखातर अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. उदा.१.  शिक्षक संघटनांना काही ठराविक कालावधी नंतर अधिवेशन रजा मंजूर केली जाते. विशेष म्हणजे ही रजा शिक्षण सचिव मंजूर करतात. आता संघटना चा असा दावा असतो की शिक्षकांच्या हितासाठी हे अधिवेशन असते. कदाचित प्रशासन देखील याचे समर्थन करेल. पण साधारणपणे ५ दिवस सुट्टी या काळात पडते. कारण शिक्षक संघटना या अधिवेशनाचा कालावधीच असा निवडतात कि कागदावर सुट्टी २-३ दिवस दिसावी पण प्रत्यक्षात ती ५-६ दिवस मिळावी. आता शिक्षक संघटनाची मागणी अमान्य करणे प्रशासनाला सहज शक्य आहे. मात्र असे होत नाही.परिणामी समाजाचा रोष सरकारी शाळांवर अजून वाढतो. कारण अशा निर्णयामुळे समाजात एक नकारात्मक मत नकळत तयार होत जाते. आणि मग पालक सरकारी शाळांपासून दूर जातात. निव्वळ विध्यार्थांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे धाडस आता प्रशासनाला दाखवावे लागेल.



 आव्हान क्र ७. पालकांच्या, समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आव्हान.
हे आव्हान दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कालानुरूप बदलाचे आव्हान आहे. २१ व्या शतकात महासत्ता होणाऱ्या भारतच्या भावी पिढीला घडवण्यासाठी प्रशासन , शिक्षक यांना बदल आत्मसात करावे लागतील.अगदी खेडोपाडी देखील आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा जि.प.शाळांना आव्हान देत आहेत. त्यामुळे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वेगाने खेचला जातोय. परिणामी जि.प. च्या शाळा ओस पडण्याची भीती आहे.वरील सर्व आव्हानांपैकी हे सर्वात कठीण आव्हान आहे. याचा सामना तर करावाच लागेल. यासाठी शिक्षक – प्रशासन यांना हातात हात घालून काम करावे लागेल.आज पहिले तर प्रशासनाच्या अपेक्षा शिक्षक पूर्ण करत नाहीत तर शिक्षकांच्या अपेक्षा प्रशासन पूर्ण करत नाही. असा विसंवाद नकोय. यावर मात करता येईल पण सामुहिक प्रयत्नांतून.
अजूनही बरीच आव्हाने आहेत . पण मला वरील आव्हाने महत्वाची वाटलीत. आपण मला माझे विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनः पूर्वक  धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!!




Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

शाळा चालतात किती दिवस ?

शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी  मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला.  लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि  निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध ...