Skip to main content
                  सरकारी शाळांसमोरील आव्हाने : उत्तरार्ध

मागील भागात आपण ४ आव्हाने विचारात घेतली . आता शिक्षकांच्या संदर्भातील आव्हाने पाहू.
आव्हान क्र ५. प्रशासनासमोर शिक्षकांच्या गुणवत्तेचा पूर्ण वापर करण्याचे आव्हान आहे.
कसे ते पहा. सरकारी वा अनुदानित शाळांमधील शिक्षकांची निवड हि अनेक कठोर निकष लावत केली जाते. त्यामुळे हे सर्व शिक्षक गुणवत्ता धारकच असतात. याउलट विनानुदानित शाळांमध्ये हा निकष क्वचितच लावला जातो. मग जर सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता धारक शिक्षक असतील तर मग या गुणवत्ता धारक शिक्षकांचे विद्यार्थी का मागे पडतात ? हे न उलगडणारे कोडे आहे. याचा अर्थ असा होतो कि एक तर या शिक्षकांना कामात रस राहिला नसेल कारण काम केले अथवा न केले तरी आर्थिक स्थैर्य राहत असावे. नाहीतर या शिक्षकांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे कौशल्य प्रशासनाकडे नसावे. आता हे आव्हान आहे हेच  काहीना  मान्य नसण्याची शक्यता आहे. मात्र हे मान्य करा अथवा न करा वस्तुस्थिती बदलणार नाही. सरकारी शांलांमध्ये वेतन व काम हे दोन्हीही सरकारी पध्दतीने मिळते. पण जर वेतन शासकीय नियमान्वये दिले आणि कामकाज खाजगी शाळांमधील पध्दतीने केले तर  कदाचित या वर मात करता येईल.
  आव्हान क्र ६. शिक्षक संघटनाच्या हस्तक्षेपाला झुगारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
बाकीच्या राज्यात शिक्षक संघटना आहेत कि नाहीत याची मला कल्पना नाही . पण आपल्या  महाराष्ट्रात मात्र शिक्षक संघटनाचा दबाव प्रशासनावर कायम असतो. मग या दबावाखातर अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. उदा.१.  शिक्षक संघटनांना काही ठराविक कालावधी नंतर अधिवेशन रजा मंजूर केली जाते. विशेष म्हणजे ही रजा शिक्षण सचिव मंजूर करतात. आता संघटना चा असा दावा असतो की शिक्षकांच्या हितासाठी हे अधिवेशन असते. कदाचित प्रशासन देखील याचे समर्थन करेल. पण साधारणपणे ५ दिवस सुट्टी या काळात पडते. कारण शिक्षक संघटना या अधिवेशनाचा कालावधीच असा निवडतात कि कागदावर सुट्टी २-३ दिवस दिसावी पण प्रत्यक्षात ती ५-६ दिवस मिळावी. आता शिक्षक संघटनाची मागणी अमान्य करणे प्रशासनाला सहज शक्य आहे. मात्र असे होत नाही.परिणामी समाजाचा रोष सरकारी शाळांवर अजून वाढतो. कारण अशा निर्णयामुळे समाजात एक नकारात्मक मत नकळत तयार होत जाते. आणि मग पालक सरकारी शाळांपासून दूर जातात. निव्वळ विध्यार्थांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे धाडस आता प्रशासनाला दाखवावे लागेल.



 आव्हान क्र ७. पालकांच्या, समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आव्हान.
हे आव्हान दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कालानुरूप बदलाचे आव्हान आहे. २१ व्या शतकात महासत्ता होणाऱ्या भारतच्या भावी पिढीला घडवण्यासाठी प्रशासन , शिक्षक यांना बदल आत्मसात करावे लागतील.अगदी खेडोपाडी देखील आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा जि.प.शाळांना आव्हान देत आहेत. त्यामुळे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वेगाने खेचला जातोय. परिणामी जि.प. च्या शाळा ओस पडण्याची भीती आहे.वरील सर्व आव्हानांपैकी हे सर्वात कठीण आव्हान आहे. याचा सामना तर करावाच लागेल. यासाठी शिक्षक – प्रशासन यांना हातात हात घालून काम करावे लागेल.आज पहिले तर प्रशासनाच्या अपेक्षा शिक्षक पूर्ण करत नाहीत तर शिक्षकांच्या अपेक्षा प्रशासन पूर्ण करत नाही. असा विसंवाद नकोय. यावर मात करता येईल पण सामुहिक प्रयत्नांतून.
अजूनही बरीच आव्हाने आहेत . पण मला वरील आव्हाने महत्वाची वाटलीत. आपण मला माझे विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनः पूर्वक  धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!!




Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय