Skip to main content

QR coded Text Books

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साधन प्रभावीपणे वापरण्यास शिक्षक उत्सुक दिसतात.मात्र या पाठ्यपुस्तकांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे आव्हान बालभारती समोर आहे.शिक्षण मंत्र्यांनी देखील बालभारती ला ‘e-बालभारती’ चे स्वरूप देण्याचा मनोदय सदैव बोलून दाखवला आहे.तंत्रज्ञान वापराने अंकीय दरी ( digital divide ) कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभरीत्या ग्रामीण भागात पोहचवणे आवश्यक ठरते. ‘e-बालभारती’ च्या प्रयोगातून ही दरी कमी करता येणे शक्य आहे.कारण पाठ्यपुस्तके प्रत्येक मुलापर्यंत सहजरीत्या पोहचतात.पाठ्यपुस्तके तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम केली तर तंत्रज्ञान वापरास उत्सुक नागरिक प्राथमिक स्तरातुनच तयार होतील.मोबाईल च्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांना ‘e-बालभारती’ चे स्वरूप देत डिजिटल नागरिक घडवणाऱ्या अशाच  एका  यशस्वी प्रयोगाबद्दल आज जाणून घेवूयात.सोलापूर च्या जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी हा प्रयोग जून 2015 पासून राबवला आहे.QR चा पाठ्यपुस्तकात वापर करणारा हा प्रयोग.QR कोड म्हणजे Quick Responce code. मुख्यतः व्यापारी क्षेत्रात याचा वापर केला जातो.या कोड मध्ये सांकेतिक रुपात साठवलेली माहिती मोबाईल द्वारे काही क्षणात प्राप्त करता येते.मात्र या कोडचा शिक्षण क्षेत्रात  कल्पकपणे वापर रणजीतने केला.पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठासाठी  त्यांनी हे QR कोड तयार केले.या कोड मध्ये संबंधित पानांवरील आशय अंकीय स्वरुपात ( Digital content ) साठवला . या कोड मध्ये साधारणपणे  खालील घटक सामाविष्ट आहेत.

·         अभ्यासविषयक सूचनाचा संच,
·         बालकाने करावयाच्या कृती संच
·         कविता असेल तर MP३ format
·         गोष्टी साठी व्हिडीओ
·         online प्रश्नपत्रिका
·         हेप्ल्लाईन नंबर
·         आपल्या मुलाचा प्रतिसाद कॅम्मेरा मध्ये रेकॉर्ड करण्याची सुविधा
·          online feedback
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कविता त्यांनी ऑडीओ रुपात तयार करून घेतल्या.पाठांशी संबंधित विडीओ स्वतः तयार केले.पालक व शिक्षक यांना मार्गदर्शक असे विडीओ ‘QUEST’ सारख्या संस्थांकडून घेतले.तसेच मुलांचे मूल्यमापन करण्यासाठी online प्रश्नपत्रिका देखील तयार केल्या.आपल्या मुलाचा अभ्यास कसा घ्यावा ? मुल समजून कसे घ्यावे ? याविषयीच्या मागर्दर्शक सूचना देखील  या QR कोड मध्ये आहेत.हा सर्व अंकीय आशय ( Digital content )  त्यांनी QR कोड मध्ये रुपांतरीत केला. हे सर्व कोड त्यांनी पुस्तकात संबंधित पानांवर चिटकवले.मोबाईल मधील NEO Reader या app च्या सहाय्याने हा QR  कोड स्कॅन केला कि त्या पानावरील कविता ऑडीओ रुपात ऐकायला मिळते, पाठाचा विडीओ  पाहता येतो. विडीओ पाहून झाला कि लगेच online प्रश्नपत्रिका मोबाईल वर झळकू लागते.ही प्रश्नपत्रिका सोडवली असता त्याचा निकाल मुलाच्या इ-मेल वर तात्काळ प्राप्त होतो.प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने ,कधीही ,कुठेही शिकण्याची संधी यामुळे मिळत आहे.एखादा घटक मुलाला समजला नाही तर तो पुन्हा कोड स्कॅन करून शिकू शकतो.या कोड मध्ये त्यांनी online feedback  देण्याची देखील सोय केली असून काही अडचण आली तर हेल्पलाईन देखील सुरु ठेवली आहे.पाठ्यपुस्तकातील आशय जिवंत करण्याची किमया या तंत्राने साध्य झाली असून आज महाराष्ट्रातील 7427  जि.प.शाळांमधील जवळपास 1,50,000 मुले ही QR कोडेड बुक्स वापरत आहेत.मोबाईल चा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प तंत्रस्नेही नागरिक घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.या तंत्रज्ञानाची व्यापकता वाढण्याचे कारण म्हणजे त्याची सुलभता.मोबाईल त्या QR कोड वर धरला कि, त्या कोड मधील आशय आपोआप मोबाईल वर झळकू लागतो.इतके साधे हे तंत्रज्ञान. या सुलभतेमुळे ग्रामीण भागातील अशिक्षित समजला  जाणारा पालक देखील आता तंत्रस्नेही होत आहे.पाठ्यपुस्तकातील भूस्क्खलन,ग्रहण,अन्नपचन सारख्या अमूर्त संकल्पना मुलांना समजावून सांगणे कठीण जाते असा शिक्षकांचा अनुभव आहे.मात्र या तंत्रामुळे ही समस्या दूर झाली आहे. पाठ्यांशाशी संबंधित विडीओ  शोधणे , ते डाउनलोड करणे या कंटाळवाण्या प्रक्रियेला देखील यामुळे सक्षम पर्याय मिळाला आहे.
QR कोडेड बुक्स च्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी तयार केली आहेत Virtual books.(आभासी पुस्तके)
                            बालभारती च्या पुस्तकांवर मोबाईल धरला असता त्या पानावरील आशय व्हर्च्युअल रियालिटी तंत्राने मूर्त स्वरुपात अनुभवणे , पुस्तकातील अनेक अमूर्त संकल्पना 3 D विडीओ रुपात व कविता animation च्या माध्यमातून    मोबाईल वर अनुभवता येणे शक्य झाले आहे.हे सारे शक्य झाले आहे ते आभासी पुस्तकांमुळे (Virtual Text Books ). स्मार्ट फोन मधील AR या app च्या मदतीने ही virtual reality अनुभवता येणार आहे.यामुळे आता मोबाईल चा शैक्षणिक वापर करून अनेक कठीण संबोध अगदी सहज स्पष्ट करता येतील .
 आज आपण 3D चित्रपट पाहतो , 3 D चित्रे पाहतो.मात्र रणजीत ने पुस्तकेच 3 D  स्वरुपात बनवली आहेत.Augmented Reality  या तंत्राचा वापर करून ही आभासी पुस्तके बनवण्यात आली असून यात विज्ञान व भूगोल विषयातील कठीण संकल्पना 3 D  रुपात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.आपल्या जवळ असणारा हा स्मार्ट फोनच आपल्याला या आभासी पुस्तकांचा अनुभव देतो.
QR कोडेड बुक्स काय किंवा Virtual बुक्स  काय , ही भविष्याचा वेध घेणारी पुस्तके आहेत. इ-लर्निंग , डिजिटल लर्निंग च्या नावाखाली लाखो रुपये खर्ची पडत असताना मोबाईल लर्निंग चा हा प्रयोग नक्कीच दखलपात्र ठरतो.
आज अनेक शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत.जिथे आहेत तिथे विजेची समस्या देखील आहेच.संगणक प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता देखील आहेच.मात्र यावर मात करून केवळ मोबाईल च्या आधारे तंत्रस्नेही नागरिक घडवणाच्या या प्रयोगाची दखल microsoft घेतली असून रणजीत डिसले यांना  “ गोल्डन इंनोव्हेशन ” पुरस्काराने सन्मानित केले आहे.अशा यशस्वी प्रयोगांचे सार्वत्रीकरण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे.बालभारतीने अशा पुस्तकांची निर्मिती केली तर हे तंत्रज्ञान तळागाळातील नागरिकांपर्यंत सुलभरीत्या पोहचेल यात शंका नाही. 

हे पान AR app मधून स्कॅन केले असता यातील आभासी आशय मोबाईलमध्ये दिसून येईल.

वरील QR कोड NEO Reader या app च्या साह्याने स्कॅन केले असता पुस्तकातील आशय digital स्वरुपात मोबाईल वर पाहता येतो.
हे सर्व कोड मिळवण्यासाठी ९४०४६६५०९६ या क्रमांकावर तुमचा इ मेल sms करा .

रणजितसिंह डिसले


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय