Skip to main content

थर्टीफस्ट डिसेंबरला ' एसएमएस ' महाग

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे सेलिब्रेशनचे दिवस. आपल्या जवळच्या लोकांना, मित्र - मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात मस्त पर्याय म्हणजे एसएमएस.पण हेच मस्त एसएमएस ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भलतेच महाग पडतात. 
एरवी अमुक रुपयांमध्ये एवढे एसएमएस फ्री अशा अनेक स्कीम्सच्या जाहिराती सगळ्या मोबाईल कंपन्याकडून दिल्या जातात. पण ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या सेलिब्रेशनच्या दोन दिवसात मात्र अशा सगळ्या स्कीम्स बंद असतात. त्यामुळे हे दोन दिवस ' एसएमएस ब्लॅक आऊट डे ' म्हणून ओळखले जातात. ग्राहकांना एरवी दहा पैशांत, ३० पैशांमध्ये एसएमएस पाठवता येतात. मात्र या दोन दिवशी ग्राहकांना प्रत्येक लोकल एसएमएससाठी एक रुपया आणि नॅशनल एसएमएससाठी दीड रुपया आकारला जातो. त्यामुळे या दोन दिवसात आपल्या प्रिय व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे तुम्हाला महागात पडू शकते. 
त्यामुळे एसएमएसमध्ये भरमसाठ पैसे घालवून बील वाढवण्यापेक्षा तुम्ही फेसबूक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या मदतीने किंवा ई-मेलद्वारा तुम्ही मित्र मौत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता. १६० बाय टू , वे टू एसएमएस या बेवसाईट्सवर लॉग-इन करूनही तुम्ही भरपूर एसएमएस अगदी फुकटात पाठवू शकता.

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

शाळा चालतात किती दिवस ?

शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी  मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला.  लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि  निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध ...