Skip to main content

Posts

Showing posts from May, 2013

सुटलो रे बाबा सुटलो

                सुटलो रे  बाबा सुटलो तमाम भारतीयांना नमस्कार ! मी सरबजितसिंग बोलतोय. मला खूप खूप पश्याताप होतोय कि मी भारतात जन्माला आलो. जर मी पाकिस्तानी नागरिक असतो तर ना आज मी भारताच्या जेल मध्ये मस्तपैकी बिर्याणी खात बसलो असतो. जय हो गांधीजी ! तुमच्या आदर्श्यांवर भारताची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अहिसा हे तत्व सोनिया विसरलेल्या नाहीत ह ! गांधीगिरी चा विजय असो ! तिकडे चीन उद्या दिल्लीपर्यंत येण्याची आपण वाट पाहू. तोवर आपण निषेध नोंदवणे सुरु ठेउयात. इंग्रज काळात मवाळवादी नेते करत असत ते काम करण्याची आपली नीती किती कार्यक्षम आहे याचा आपण कधी विचार करणार आहोत ? त्या इटली च्या नौसैनिकांनी आपलेच जवान मारले आणि वर देशात पळून गेले. त्यांना फाशी देणार नाही म्हणून त्यानं परत आणले. आता काय त्यांना मरेपर्यंत पोसाय्चेय का?  भारतीयानो चला लवकर मेणबत्त्या घेऊन माझ्या अंतयात्रेला येणार ना ? आणि हो निषेधाचे फलक पण आणा ह. तुम्ही भारतीय ठेवढेच करू शकता. एक तर गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य  मिळायला ३० वर्षे उशीर झाला आणि आता या सोनिया गांधी वर विश्वास ठेऊन जर भारत महासत्ता