Skip to main content

सुटलो रे बाबा सुटलो



                सुटलो रे  बाबा सुटलो
तमाम भारतीयांना नमस्कार ! मी सरबजितसिंग बोलतोय. मला खूप खूप पश्याताप होतोय कि मी भारतात जन्माला आलो. जर मी पाकिस्तानी नागरिक असतो तर ना आज मी भारताच्या जेल मध्ये मस्तपैकी बिर्याणी खात बसलो असतो. जय हो गांधीजी ! तुमच्या आदर्श्यांवर भारताची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अहिसा हे तत्व सोनिया विसरलेल्या नाहीत ह ! गांधीगिरी चा विजय असो ! तिकडे चीन उद्या दिल्लीपर्यंत येण्याची आपण वाट पाहू. तोवर आपण निषेध नोंदवणे सुरु ठेउयात. इंग्रज काळात मवाळवादी नेते करत असत ते काम करण्याची आपली नीती किती कार्यक्षम आहे याचा आपण कधी विचार करणार आहोत ? त्या इटली च्या नौसैनिकांनी आपलेच जवान मारले आणि वर देशात पळून गेले. त्यांना फाशी देणार नाही म्हणून त्यानं परत आणले. आता काय त्यांना मरेपर्यंत पोसाय्चेय का?
 भारतीयानो चला लवकर मेणबत्त्या घेऊन माझ्या अंतयात्रेला येणार ना ? आणि हो निषेधाचे फलक पण आणा ह. तुम्ही भारतीय ठेवढेच करू शकता. एक तर गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य  मिळायला ३० वर्षे उशीर झाला आणि आता या सोनिया गांधी वर विश्वास ठेऊन जर भारत महासत्ता होणार असे वाटत असेल तर तुम्हाला शुभेच्छा !  मागच्या महिन्यात भारतीय जवानांना मारून टाकले तरी देखील सोनियाच्या मंत्रिमंडळातील हे शंड मंत्री मुग गिळून गप्प राहीले आणि आता माझा खून केल्यावर जर याचा केवळ निषेधच नोंदवला जाईल. यापेक्षा काहीच होणार नाही. कारण कर्नाटक निवडणूक तोंडावर आहे. तिथे प्रचार करायला वेळ हवा न .  उगाच कसला गोंधळ घालता. गप्प बसा. मला एक प्रश्न पडलाय कि भारताची परराष्ट्र  नीती कोणता अधिकारी ठरवतोय.? हे नक्कीच  I.F.S आहे न . देशातील नागरिकांचे रक्षण करावे  हे कळत नाही का  रे तुला?  एका भारतीय नागरिकाचा खून केला जातो आणि पंतप्रधान केवळ निवेदनच देतात. राष्ट्रपती प्रणव जि तुम्ही तरी जागे व्हा ? का तुम्ही पण सोनियाने हे पद दिलेय म्हणून चूप बसणार? हे  गप्प बसणार  कारण मी काय सेलेब्रेटी नाही  सलमान ने दारू पिऊन गाडी चालवत फुटपाथवर २-४ जण उडवले तरी त्याला आजारपण आहे म्हणून कोर्टात सुद्धा न येण्याची परवानगी देणाऱ्या न्यायव्यवस्थेवर मी कसा विश्वास ठेऊ. भगवान के घर देर है अंधेर नही  अरे पण वाट पाहत माझा जीव गेला ना आता तर सगळा अंधारच अंधार.. उद्या सुशीलकुमार ( हसमुख कुमार) येतील मला फुले वाहतील टीव्हीवर थेट दाखवतील . २ दिवस बडबड करतील नंतर सब शांत. अहो ज्या देशात संसदेचे रक्षण करताना शहीद झालेल्यांना न्याय मिळत नाही तिथे मी तर कीस झाड कि पत्ती ! माझा आणि फक्त माझाच खून झालाय. हा काय भारताचाच खून नाही. मी स्वर्गात पाकिस्तानी नागरिक म्हणून नोंदणी केलीय. कारण या देशात जास्त पापे होतात न म्हणून पाकिस्तानी नागरिकांना स्वर्गात विशेष सोई असतात.  भेटू  परत .


खरच आपली परराष्ट्र नीती अपयशी ठरतेय का? हा मोठा सवाल या निमित्ताने पुढे येतोय. कारण या कामचुकार नीतीमुळे आपण आपले स्वतंत्र तर गमावणार नाही ना अशी भीती वाटत्तेय.मागील काही घटनांवर नजर टाकली तर आपण आपल्या शेजारी किती शत्रू निर्माण केलेत लक्षात येईल.
१.      पाक ने आपले जवान मारून टाकले. आपण केवळ कडक समाज दिली. पाक ला आर्थिक दृष्टीने नामोहरम करू शकतो. पण आमचे शरद पवार साहेबच जर किकेट खेळाचे आयोजन करत असतील काय  करावे?
२.      श्रीलंकेच्या विरोधातातील ठराव युनोत आला त्यावेळी आपण ठरावाच्या बाजूने मतदान केले . परिणामी तो देश नाराज झाला. आणि आणखी दुरावा वाढला. आता तो त्या देशाचा अंतर्गत मामला आहे. आपण त्यात नाक खुपसू नये. पण तरीही आपण अमेरिकेला जवळ मानले आणि लंकेला दूर लोटले. उद्या आपल्यावर हल्ला झाला तर काय अमेरिका येणार नाही मदतीला. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य असावे. आर्थिक विकास साधण्यासाठी राष्ट्रहिताला मातीमोल समजू नका. शेजारी केवळ मित्रच असावेत. भारताच्या या कृतीमुळे लंका चीन च्या जवळ जाऊ पाहतेय. ते धोकादायक आहे.
३.      तिकडे बांगलादेश धुमसतोय. विरोधी पक्षाने आपल्या राष्ट्रपती ना भेट नाकारली . आणि आपण अजून पण ते गंभीरपणे घेतच नाही.
४.      चीन तर २०-२० किमी आपल्या सीमेत येतो आणि आपण केवळ निषेधच नोंदवत राहतो. चीन ने आजवर सीमा प्रश्नी रशिया तिबेट अफगाण यांना पराभूत केलेय आणि ते आता आपल्यावर चाल करून आहेत. पण लक्षात घ्या ते आपल्यावर हल्ला करूच शकत नाहीत कारण त्यांची १२% बाजारपेठ आपणावर अवलंबून आहे. ते केवळ भीती दाखवत आहेत. १९६१ चा पराभव किती दिवस मनात ठेवायचा. जरा हटके सोचो. चीनच्या सीमेत करा न अतिक्रमण. ते काही १२ महिने हिमालयात थांबत नाहीत. त्यांना आजवर सव्वा शेर भेटला नाही म्हणून इतके धाडस करतात. पण त्यांची मुसकी आपण बांधू शकतो हे जरा दाखऊन द्या  ना.
५.      परराष्ट्र नीती ची रचना बदला. देशहित महत्त्वाचे.केवळ प्रादेशिक पक्ष नाराज होतील म्हणून देश हित कमी लेखू नका नाहीतर असे किती तरी सरबजीत बळी जातील.



Comments

  1. बरोबर आहे मित्रा तुझं.पण लक्षात कोण घेतो?देशात कर्तेपणा पेक्षा नाकर्तेपणा वाढला आहे.देशात केवळ सरकार काहीही करू शकत नाही.नागरिकांचीही काही कर्तव्ये असतात.मला तर हा देशच माझा वाटेनासा झाला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय