Skip to main content

थर्टीफस्ट डिसेंबरला ' एसएमएस ' महाग

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे सेलिब्रेशनचे दिवस. आपल्या जवळच्या लोकांना, मित्र - मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात मस्त पर्याय म्हणजे एसएमएस.पण हेच मस्त एसएमएस ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भलतेच महाग पडतात. 
एरवी अमुक रुपयांमध्ये एवढे एसएमएस फ्री अशा अनेक स्कीम्सच्या जाहिराती सगळ्या मोबाईल कंपन्याकडून दिल्या जातात. पण ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या सेलिब्रेशनच्या दोन दिवसात मात्र अशा सगळ्या स्कीम्स बंद असतात. त्यामुळे हे दोन दिवस ' एसएमएस ब्लॅक आऊट डे ' म्हणून ओळखले जातात. ग्राहकांना एरवी दहा पैशांत, ३० पैशांमध्ये एसएमएस पाठवता येतात. मात्र या दोन दिवशी ग्राहकांना प्रत्येक लोकल एसएमएससाठी एक रुपया आणि नॅशनल एसएमएससाठी दीड रुपया आकारला जातो. त्यामुळे या दोन दिवसात आपल्या प्रिय व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे तुम्हाला महागात पडू शकते. 
त्यामुळे एसएमएसमध्ये भरमसाठ पैसे घालवून बील वाढवण्यापेक्षा तुम्ही फेसबूक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या मदतीने किंवा ई-मेलद्वारा तुम्ही मित्र मौत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता. १६० बाय टू , वे टू एसएमएस या बेवसाईट्सवर लॉग-इन करूनही तुम्ही भरपूर एसएमएस अगदी फुकटात पाठवू शकता.

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय