Skip to main content

थर्टीफस्ट डिसेंबरला ' एसएमएस ' महाग

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे सेलिब्रेशनचे दिवस. आपल्या जवळच्या लोकांना, मित्र - मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात मस्त पर्याय म्हणजे एसएमएस.पण हेच मस्त एसएमएस ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भलतेच महाग पडतात. 
एरवी अमुक रुपयांमध्ये एवढे एसएमएस फ्री अशा अनेक स्कीम्सच्या जाहिराती सगळ्या मोबाईल कंपन्याकडून दिल्या जातात. पण ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या सेलिब्रेशनच्या दोन दिवसात मात्र अशा सगळ्या स्कीम्स बंद असतात. त्यामुळे हे दोन दिवस ' एसएमएस ब्लॅक आऊट डे ' म्हणून ओळखले जातात. ग्राहकांना एरवी दहा पैशांत, ३० पैशांमध्ये एसएमएस पाठवता येतात. मात्र या दोन दिवशी ग्राहकांना प्रत्येक लोकल एसएमएससाठी एक रुपया आणि नॅशनल एसएमएससाठी दीड रुपया आकारला जातो. त्यामुळे या दोन दिवसात आपल्या प्रिय व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे तुम्हाला महागात पडू शकते. 
त्यामुळे एसएमएसमध्ये भरमसाठ पैसे घालवून बील वाढवण्यापेक्षा तुम्ही फेसबूक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या मदतीने किंवा ई-मेलद्वारा तुम्ही मित्र मौत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता. १६० बाय टू , वे टू एसएमएस या बेवसाईट्सवर लॉग-इन करूनही तुम्ही भरपूर एसएमएस अगदी फुकटात पाठवू शकता.

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

QR coded Text Books

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साध...