Skip to main content

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा.


“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा. ”
 अरे काय  तुला  वेड लागलाय का ? चप्पल आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध.  आहे हो. कसं आहे मित्रांनो  जर आपले  पाय पोळत असतील तर काय करतो  आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत असतो. पण  पाय पोळू लागले म्हणून तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे. आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू नका तुम्ही अगोदर चप्पल घाला
 मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा भ्रष्टाचार करतो. चला आता आपण समाजातील इतर लोक कसा भ्रष्टाचार करतात ते पाहू. या लेखमालेसाठी लेखन करताना मला असे जाणवले कि समाजातील कोणताही घटक या भ्रष्टाचार रुपी राक्षसापासून दूर नाही. आणि जर हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सोपा उपाय .
                  “ प्रत्येकाने आपला भ्रष्टाचार थांबवा.”
है हा काय उपाय आहे काय ? हो हाच आहे उपाय. कसा ते पहा.
 “ मी कोणत्याही कामासाठी लाच घेणार नाही. बिना पैश्याची कामे करीन. जी कामे नियमात आहेत  ती करीन.”
ही प्रतिज्ञा कुणी करावी ?
तर सर्व सरकारी नोकरांनी. मुख्य सचिव , उप सचिव, अप्पर सचिव , अधिषक,संचालक, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी , ग्रामसेवक. कारण हे  लोक नियमात असणारी कामे पण करत नाहीत.. जर यांनी फक्त नियमातील कामे केली तरी बराच भ्रष्टाचार थांबेल.
सामान्य नागरिकांनी काय करावे तर 
मी कोणाला पण लाच देणार नाही. कारण मी लाच देतो म्हणून तर ते घेतात ना.
मी बस/रेल्वे/विमान  मध्ये तिकीट काढून बसेन. बस मध्ये रोजच प्रवास करत असेन तर १०% चा पास काढीन.पण  डुप्लीकेट अपंग पास काढणार नाही.कारण या डुप्लीकेट पास मुळे बिचारा वाहक चालक यांना कमी पगार मिळतो. मी जर तिकीट काढून रोजच प्रवास केला तर मग महामंडळाचे उत्पन्न वाढेल आणि ते मग यांना जास्त पगार देतील.
मी रेशनकार्ड वर मिळणारे धान्य खरेदी करीन . कारण मी ते खरेदी करत नाही म्हणून ते मग व्यापारी घेतो आणि जास्त भावाने विकतो.
मी बँकेत रांगेत उभा राहून माझे काम करीन .उगाच गोंधळ घालून गर्दीत घुसणार नाही. त्या बँकेत माझा भाऊ असला तरी मी रांगेतच उभा राहीन. यामुळे  काय होणार तर रांगेत म्हातारी माणसे असतात त्यांना वेळात पैसे मिळतील. मी नियम पाळले तर त्यांना फायदा होईल . आणि उद्या जेंव्हा मी म्हातारा होईन तेंव्हा मला पण वेळात पैसे मिळतील. जर मला भविष्यात असे घडवायचे असेल तर मग हे बीज आताच पेरावे लागेल.
मी एक contractor आहे. मी लाच न देता कामे मिळविण.जरी कामे मिळाली नाही तरी चालेल. पण लाच न देता काम मिळवीन.  कारण मी काम quality  चे करीन. यासाठी मी अभियंत्यांना पण लाच देणार नाही. कारण जर मी रोड चांगला केला तर उद्या मी किंवा माझी मुलगी याच रोड वरून गेली आणि रोड खराब असेल तर याचे दुष्परिणाम माझ्याच कुटुंबाला भोघावे लागतील. भविष्यात मला या रोड वरून जाताना खड्डे नसावेत असा रोड करीन.
मी आहे  बसचा चालक. मी प्रवास्यांना त्यांचे सुट्टे पैसे आठवणीने परत करीन. उगाच १ , २  रुपये खाणार नाही. कारण १, २, रुपयांनी सुद्धा माझ्याकडे एका फेरी माघे बरीच रक्कम गोळा होते. असा चोरीचा पैसा मला पचणार नाही. ज्या पावलांनी पैसा आला त्याच पावलांनी जाणार.
मी आहे गटशिक्षणाधिकारी. मी पैसे न घेता बदल्या करीन. नियम मोडणाऱ्या शिक्षकाना शिक्षा करीन. पण पैसे उकळणार नाही. जे शिक्षक चांगले काम करतात त्यांनाच उत्कृष्ट शेरा देणार आणि वेतन वाढ देणार. पैसे घेऊन शेरे देणार नाही. माझी बदली पण पैसे न देताच करीन.
मी आहे बांधकाम खात्यातील अभियंता. मी कोणतेही contract  पैसे न देता नियमातील अटी पाहूनच देणारं. काम कसे  quality चे होईल ते पाहीन. कारण याच रोड वरून मला जावे  लागेल. खराब रोड मुळे मलाच मान पाठ याचे विकार होतील. पैसे घेऊन आजार विकत घेणार नाही. मी पैसे घेतले नाही  तर contractor पण काम चांगले करील. माझा आणि देशाचा फायदा.
ही तर आहेत प्रातिनिधिक उदाहरणे. तुम्ही पण सामील व्हा आणि संपवा हा भ्रष्टाचार !

Comments

  1. चांगली कल्पना आहे. Try करून बघायला हरकत नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

QR coded Text Books

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साध...